Aug 11, 2012

हरितालिका


स्त्रियांनी मनासारखा पती मिळावा म्हणून दिवसभर उपवास करावा. सखी आणि पार्वती यांच्या प्रतिमांची पूजा करावी. सुवासिक फुले, फळे, झाडांची पाने (पत्री) अर्पण करावीत आणि खेळ खेळून मैत्रीणींनी जागरण करावे - या पद्धतीने हा दिवस साजरा करतात. हरितालिकेचे व्रत हे पार्वतीने शंकराला प्राप्त करण्यासाठी केलेल्या व्रताशी जोडलेले आहे.

बदलत्या काळानुसार काही सणांमागे असलेला अर्थ बदलून त्याला वेगळ्या स्वरूपात आणण्याचे प्रयत्न केले जातात. पूर्वी लहान वयात विवाह होत. मुलींचे खेळण्याचे वय असताना, ते बाल्य जपण्यासाठी उत्सवांच्या मदतीने महिलांना -मुलींना नटण्या-मुरडण्याची, एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची संधी देण्यासाठी पूर्वापार काही प्रथा सुरू आहेत.त्यांतीलच ही एक होय.